
हिंदुस्थानच्या संघाची पावले आता पहिला कसोटी सामना जिंकण्यासाठी वळलेली आहेत. कारण श्रीलंकेविरुद्धच्या या कसोटीतील पाचव्या दिवशी हिंदुस्थानला विजयासाठी सहा विकेट्सची गरज आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी 14 फलंदाज बाद झाले असले तरी हिंदुस्थानने कसोटीवर आपला वचक कायम ठेवला आहे. भारताने दुसऱ्या डावात 193 धावा केल्या आणि श्रीलंकेसमोर या खेळपट्टीवर विजयासाठी 372 धावांचे अशक्यप्राय लक्ष्य ठेवले. कसोटीचा चौथा दिवस संपण्यापूर्वी श्रीलंकेचे चार फलंदाज बाद झाले. ज्यामुळे त्यांची धावसंख्या 4 बाद 84 अशी झाली आहे. श्रीलंका अजूनही भारतापेक्षा 288 धावांनी पिछाडीवर आहे आणि खेळपट्टी पाहता या धावा पाचव्या दिवशी होऊ शकणार नाहीत असे म्हटले जात आहे. त्यामुळेच भारतीय संघ पहिल्या कसोटीच्या विजयाच्या उंबरठय़ावर आहे असे दिसत आहे. आता हिंदुस्थानचे फिरकीपटू कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.
हिंदुस्थानची वाईट सुरुवात, पण…
हिंदुस्थानची चौथ्या दिवसाची सुरुवात वाईट झाली. कारण हिंदुस्थानचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल हा दिवसाच्या तिसऱ्याच चेंडूवर बाद झाला, पण त्यानंतर हिंदुस्थानी संघाने आक्रमक पवित्रा घेतला आणि श्रीलंकेच्या गोलंदाजीचा चांगली धुलाई केली. सलामीवीर केएल राहुलने 35 आणि देवदत्त पडिक्कलने 44 धावा केल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी करून डाव सावरला. पहिल्या सत्रानंतर धावसंख्या 4 बाद 116 अशी स्थिती होती.
ऋषभ पंतची शानदार खेळी
ऋषभ पंतने श्रीलंकेच्या गोलंदाजांवर तुफान हल्ला चढवला. त्याने 69 चेंडूंमध्ये दोन षटकारांसह 66 धावा केल्या. पंत कसोटी क्रिकेटमध्ये 100 षटकार मारणारा पहिला भारतीय ठरला. त्याचबरोबर जगातील सर्वात कमी षटकांच्या डावात हा टप्पा गाठणारा फलंदाजही बनला. पंतच्या या खेळीमुळे हिंदुस्थानला 193 धावांपर्यंत पोहोचता आले. पंतनंतर बाकीचे फलंदाज आक्रमक फटकेबाजी करायला गेले, पण त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
श्रीलंकेला सुरुवातीलाच अडचणीत आणले
हिंदुस्थानच्या 372 धावांच्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ मैदानात उतरला खरा, पण हिंदुस्थानच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच श्रीलंकेला अडचणीत आणले. मोहम्मद सिराजने डावाच्या सहाव्या षटकात निशान मदुष्काला (6) बाद केले. त्यानंतर डोक्याला दुखापत झाल्यामुळे बदली खेळाडू म्हणून आलेला पसिंदू सुरियाबंदारा मानव सुथारच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. श्रीलंकेला कामिंदू मेंडिस (2) आणि लाहिरू उदारा (16) बाद झाल्याने आणखी दोन धक्के बसले. त्यामुळे त्यांची 4 बाद 47 अशी अवस्था झाली होती. भारतासाठी मानव सुथारने दोन बळी घेतले, तर प्रसिध पृष्णा आणि सिराज यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. या कसोटीच्या पहिल्या डावात श्रीलंकेच्या सोनल दिनुशाने शतक झळकवले होते आणि आता तो दुसऱ्या डावात 25 धावांवर खेळत. त्यामुळे पाचव्या दिवशी दिनुशाला हिंदुस्थानचे गोलंदाज कसे लवकर बाद करतात याची उत्सुकता सर्वांना असणार आहे. त्याचबरोबर निरोशन डिकवेला अजून फलंदाजीला यायचा बाकी आहे. तोदेखील भारताच्या विजयात अडसर ठरू शकतो असे म्हटले जात आहे.
यशस्वी जैसवाल पुन्हा अपयशी
हिंदुस्थानच्या संघात एकीकडे चढाओढ सुरू असताना युवा सलामीवीर यशस्वी जैसवाल मात्र अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या डावात यशस्वीने आक्रमक सुरुवात केली होती, पण 32 धावांवर असताना त्याने आत्मघात केला आणि तो धावबाद झाला. यशस्वीला यावेळी मोठी खेळी साकारण्याची संधी होती, पण यावेळी त्याला या संधीचे सोने करता आले नाही. त्यामुळे दुसऱ्या डावात तो कशी फलंदाजी करतो, याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या होत्या. यशस्वी दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरला, पण त्याला यावेळी भोपळाही पह्डता आला नाही. यशस्वी यावेळी फक्त तीन चेंडूच खेळून तंबूत परतला. त्यामुळे आता पुढच्या कसोटीत त्याला संधी मिळणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.



























































