…तर सर्वोच्च न्यायालयाने देश चालवावा! मणिपूर घटनेवरून केंद्राची खरडपट्टी काढल्याने भाजपवाले खवळले

हे पाच न्यायमूर्ती सध्या काय करतात याबाबत अनेकांना माहिती नाहीये. या पाचपैकी 4 न्यायमूर्ती हे आता निवृत्त झाले असून यातले एक न्यायमूर्ती हे सर्वोच्च न्यायालयात आहेत.

मणिपूरमधील महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या घटनेमुळे देश हादरला आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळली आहे. यावरून सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने केंद्र व राज्य सरकारची खरडपट्टी काढत, काहीतरी करा अन्यथा आम्हालाच पावलं उचलावी लागतील, अशा इशारा दिला आहे. यामुळे भाजपवाले चांगलेच खवळले असून आमदार अतुल भातखळकर यांनी तर उचलली जीभ लावली टाळय़ालाकरत, सर्वोच्च न्यायालयाने देश चालवावा, असं सुनावलं आहे.  

मणिपूरमधील नग्न धिंड प्रकरणावरून सर्वेच्च न्यायालयाने दिलेली तंबी भाजप नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे. भाजप आमदार अॅड. अतुल भातखळकर यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांवर आक्षेप घेतला आहे. मणिपूरमधील घटनेबाबत सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं केलेल्या टिप्पणीची बातमी रिट्विट करत भातखळकर यांनी न्यायालयावर टीका केली आहे. सरकारचे काम सर्वेच्च न्यायालय करणार असेल तर सर्वेच्च न्यायालयानेच देश चालवावा. कशाला हव्यात निवडणुका आणि संसद? खुर्चीत बसून कायदासुव्यवस्थेची ऑर्डर पास केली की देश कसा सुरळीत चालेल? असा उलट सवाल भातखळकर यांनी केला आहे. दरम्यान, त्यांच्या या ट्विटवरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

अतुलदादा,  तुझी आई, बहीण असती तर

अतुलदादा, तुझी बहीण, आई असती किंवा तुझी बायको असती तर तू असंच बोलला असता का? दादा आहेस ना तू? अरे, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी रे बाबाकाही सेन्सेटिव्हिटी आहे की नाही? राजकारण करण्याच्या काही मर्यादा आहेत की नाही? कशातही राजकारण करणार का, असे सवाल कॉँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी केले आहेत.