अयोध्येत वादग्रस्त जागेवर मंदिर का बांधले नाही यावर बोला, संजय राऊत यांचे भाजप नेत्यांना आव्हान

मंदिर वही बनायेंगे, असा भाजपाचा नारा होता. अयोध्येत जिथे मशीद पाडली त्या वादग्रस्त जागेवर मंदिर का बांधले जात नाही यावर भाजपने बोलावे, असे आव्हान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिराचे श्रेय घेण्यासाठी धडपडणाऱ्या भाजप नेत्यांना दिले आहे.

अयोध्येत जिथे मंदिर बनवण्याच्या चर्चा सुरू होत्या तिथे मंदिर बनवलेले नाही. तिथून चार किमीवर मंदिर बांधण्यात आले आहे. ते कोणीही बांधले असते. पण त्यावर आम्हाला चर्चा करायची नाही. ती वादग्रस्त जागा आजही तशीच आहे. यावर भाजपाने बोलायला हवे. मंदिर वही बनायेंगे, असा भाजपाचा नारा होता; पण तुम्ही तिथं जाऊन पहा मंदिर बनवलं आहे की नाही, असे संजय राऊत म्हणाले.