25 टक्के कोटा प्रवेशांसाठी विद्यार्थी नोंदणी उद्या 16 एप्रिल पासून सुरू होणार आहे. पालकांना आपल्या पाल्याच्या अर्ज भरण्यासाठी 30 एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली आहे. आरटीई प्रवेशाच्या वेबसाईटवरून पालकांना ऑनलाईन अर्ज भरता येणार असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सांगितले.
आरटीई प्रवेशासाठी शाळा नोंदणीसाठी दिलेल्या मुदतीत अनेक शाळांनी नोंदणी केली नाही.त्यामुळे सुमारे एक आठवडा आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबली.यंदा राज्यातील एकूण 75 हजार 960 शाळांनी नोंदणी केली असून या वर्षी आरटीई प्रवेशासाठी 9 लाख 76 हजार 619 जागा उपलब्ध झाल्या आहेत.मात्र, शिक्षण विभागाने आरटीई प्रवेश प्रक्रियेत बदल केला आहे.त्यामुळे पालक वर्गात प्रचंड नाराजी आहे.