पावसाळा व कानाचा संसर्ग

> डॉ. सुश्रृत देशमुख

पावसाळ्याला सुरुवात होताच सर्वच वयोगटात कानदुखीच्या समस्या सुरू होतात. कानासंबंधी संसर्गाच्या पारींचे डॉक्टरकडे गेल्यावर कानात संसर्ग झाल्याचे निदान होते. पावसाळ्यामध्ये बॅक्टेरियाची झपाटय़ाने वाढ होते आणि त्यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक असते. तज्ञ सांगतात की, हवामानातील आर्द्रतेमुळे कानाच्या संसर्गाचे प्रमाण वाढते. कानात जमा होणाऱया मळातील ओलावा व हा जिवाणू किंवा बुरशी (bacteria of fungi) वाढीसाठी पावसाळ्यातील वातावरण पोषक ठरते. जिवाणूंमुळे कानातील संसर्ग वाढतो. कानाचा संसर्ग झाला असेल तर वेदनेबरोबरच इतर समस्याही उद्भवू शकतात. यावर वेळीच उपचार न केल्यास वेदना वाढू शकते. पावसाळ्यात थंड आणि आंबट पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे. त्यामुळे कानाचे दुखणे आणखी वाढू शकते.

संसर्गाची कारणे कोणती
सर्दी आणि फ्लूसोबत अॅलर्जीमुळे सुध्दा पांमण होऊ शकते. स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया आणि हिमोफिलस इन्फ्लूएंझा यांसारखे जीवाणू हे कानाच्या संसर्गाची मुख्य कारणे आहेत. पावसाळ्यात यांची झपाटय़ाने वाढ होते. पावसाळ्यात कान स्वच्छ आणि कोरडे ठेवावेत. यासाठी कोरडय़ा आणि स्वच्छ सुती कापडाचा वापर करू शकता. मात्र इअर बड्स आणि कॉटन स्वॅबपासून दूर राहा, कारण ओलसर हवामानात कापसाच्या स्वॅबमध्ये बॅक्टेरिया अडकून तो कानात पसरू शकतो. इअरफोन्स वेळोवेळी साफ करून, निर्जंतुकीकरण करून घ्यावेत. त्यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होतो. गळ्यात खवखव किंवा घशाचा संसर्ग झाल्यामुळेही कान दुखणे तसेच संसर्गाचा त्रास होऊ शकतो. कानात ओलावा राहिल्याने बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढतो.

लक्षणे कोणती?
> कानात वेदना होणे > सूज येणे > लालसरपणा > नीट ऐकू न येणे > कानातून पांढरा, पिवळसर स्राव बाहेर पडणे > कान बंद पडणे वा दडे बसणे > डोकेदुखी

काय उपचार कराल?
कानात वेदना होत असतील किंवा कान भरलेला, जड जाणवत असेल तर त्याकडे तातडीने लक्ष द्या. लवकरात लवकर ईएनटी तज्ञ डॉक्टरांना दाखवा. वेळीच कानाची साधी तपासणी केल्यास निदान करता होऊ शकते. ऑडिओग्राम करून श्रवणशक्तीमध्ये काही बिघाड झाला असल्यास, कानात द्रव जमा झाला असल्यास त्याची खात्री करून घेता येऊ शकते.

(लेखक पुणे येथील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलचे कान, नाक, घसा तज्ञ आहेत)