
बिहारमधील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारकडून आपल्या सुरक्षेत कपात केल्याबद्दल आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार यांना जबाबदार धरले आहे.
लालू यादव यांना पत्रकारांनी सम्राट चौधरी प्रशासनाच्या अलीकडील आदेशाबाबत प्रश्न विचारले. यावर लालू यादव यांनी मोजक्या शब्दांत उत्तर देताना सांगितले, ‘होय, सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. हे सर्व नितीश कुमार यांच्या सांगण्यावरून केले जात आहे’.
गेल्या महिन्यात, नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन राज्यसभेत प्रवेश केला, ज्यामुळे राज्यात पहिल्यांदाच भाजपचे सरकार स्थापन झाले आणि नितीश कुमार यांचे सुपुत्र निशांत यांचा सम्राट चौधरी यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

























































