निवडणुकीनंतर मणिपुरात पुन्हा भडका, सीआरपीएफचे दोन जवान ठार

मतदान पार पडताच मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळून आला. कुकी समुदायाने लष्करी जवानांवर केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे दोन जवान ठार झाले असून, दोघे जखमी झाले.

कुकी समुदायाने मध्यरात्रीच्या सुमारास मैतेई बहुल गाव नारानसैना गावावर हल्ला चढवला. अंदाधूंद गोळीबार करण्यात आला. चार हातबॉम्बही फेकण्यात आले. या हल्ल्यात सीआरपीएफच्या 128 बटालियनचे पोलीस निरीक्षक जाटव दास, सहायक पोलीस निरीक्षक एन. सरकार. शिपाई अरुप सैनी आणि आफताब हुसैन हे गंभीर जखमी झाले. या सर्वांना तात्काळ स्थानिक सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरू असताना एन. सरकार आणि अरुप सैनी या दोघांचा मृत्यू झाला.