
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओवरून काँग्रेसने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी पंतप्रधानांवर राजकीय विरोधकांविरोधात कठोर भाषा वापरण्याचा तसेच स्वतःला व्हिक्टीम म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.
एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार, जयराम रमेश यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले की, पंतप्रधान मोदी राजकीयदृष्ट्या स्वतःला व्हिक्टीम असल्याची भूमिका घेतात. ते आपल्या विरोधकांविरुद्ध जाहीर सभा आणि संसदेत आक्षेपार्ह भाषा वापरतात, तसेच वारंवार खोटे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, असे रमेश म्हणाले.
खुद को नॉन-बायोलॉजिकल बताने वाले प्रधानमंत्री को विक्टिम कार्ड खेलना बेहद पसंद है।
वह अपने पूर्ववर्तियों और राजनीतिक विरोधियों के खिलाफ बेहद आपत्तिजनक और कटु भाषा का इस्तेमाल करते हैं। उन्हें बदनाम करने के लिए वे न केवल अपनी सार्वजनिक सभाओं में, बल्कि संसद के भीतर भी बार-बार झूठ…
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) August 1, 2026
जयराम रमेश यांनी पुढे आरोप केला की, संसदेच्या आत आणि बाहेर असभ्य भाषा वापरणाऱ्या लोकांना पंतप्रधानांकडून मोकळीक आणि संरक्षण मिळत आहे. तसेच, तरुणांशी संबंधित विविध मुद्द्यांवर सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. काँग्रेस खासदार म्हणाले की, एनटीएच्या पेपरफुटीने त्रस्त असलेल्याआणि गृह मंत्रालयाच्या नावाखाली विद्यार्थी आंदोलनांवर झालेल्या क्रूर कारवाईमुळे लाखो तरुणांना झालेल्या त्रासाबद्दल पंतप्रधानांनी माफी मागावी, याची आज संपूर्ण देश वाट पाहत आहे. ते पुढे म्हणाले की, राम मंदिर ट्रस्टने देणग्यांची कथित चोरी आणि विश्वासाचा विश्वासघात केल्याबद्दलही पंतप्रधानांनी माफी मागावी, अशी संपूर्ण देशाची अपेक्षा आहे.
काल रात्री पंतप्रधानांनी आत्ममग्नतेचा कळस गाठत, आपण आपल्या तरुणांना माफ केल्याचे जाहीर केले. हा देशाचा आणि त्यांच्या सरकारच्या काळात त्रासलेल्या तरुणांचा अपमान आहे. पंतप्रधानांच्या इन्स्टाग्रामवरील बैठका आता कोणालाही फसवू शकत नाहीत, असे मत जयराम रमेश यांनी व्यक्त केले.



























































