
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये स्वयंपाकघरात साठवलेले अन्न खराब होण्याचे प्रमाण वाढू लागते. उन्हाळ्यात स्वयंपाकघरात ठेवलेले दूध लवकर खराब होते. कधीकधी, फ्रिजमध्ये ठेवल्यानंतरही ते नासू लागते. उष्णतेमुळे जिवाणूंची वेगाने वाढ होते, त्यामुळे काही मिनिटांतच दूध खराब होते. काही सोप्या आणि पारंपरिक पद्धती आहेत, ज्या तीव्र उष्णतेतही दूध जास्त काळ ताजे ठेवण्यास मदत करू शकतात.
दूध उकळण्यापूर्वी, तुम्ही वापरत असलेले भांडे थंड पाण्याने स्वच्छ धुवा. तळाशी थोडे पाणी राहू द्या. यामुळे दूध करपण्यापासून वाचते आणि ते जास्त काळ ताजे राहते.
दूध उकळताना, त्यात एक किंवा दोन ठेचलेल्या हिरव्या वेलची घाला. यामुळे केवळ सुगंधच वाढत नाही, तर दूध जास्त काळ टिकण्यासही मदत होते.
उन्हाळ्यात दर ८ तासांनी दूध उकळावे. दूध खोलीच्या तापमानावर आल्यानंतरच फ्रिजमध्ये ठेवा. गरम दूध थेट फ्रिजमध्ये ठेवल्याने ते नासू शकते.
उन्हाळ्यात अन्न आणि पेये खराब होण्याची शक्यता जास्त असते. थोड्याशा निष्काळजीपणामुळे ठेवलेले दूध देखील खराब होऊ शकते. उन्हाळ्यात तुमच्याही घरातील दूध खराब होत असेल तर, काही महत्त्वाच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.
तुम्ही दूध उकळायला विसरलात आणि ते खराब होईल असे वाटत असल्यास, त्यात चिमूटभर बेकिंग सोडा घाला आणि नंतर ते उकळवा. यामुळे दूध खराब होणार नाही. जास्त बेकिंग सोडा घालू नका, कारण यामुळे दुधाची चव बिघडु शकते.
तुमच्या घरी रेफ्रिजरेटर नसेल, किंवा ते तुटलेले असेल किंवा काम करत नसेल, तर दूध चांगले उकळवा. नंतर ते थंड होऊ द्या. एका मोठ्या भांड्यात पाणी भरा आणि दूध पंख्याखाली ठेवा. यामुळे दूध खराब होणार नाही.
कधीकधी लोक जुन्या दुधाच्या टोपात नवीन दूध गरम करतात. त्यामुळे दूध खराब होण्याचा धोका अधिक असतो. उन्हाळ्यात दूध स्वच्छ टोपामध्ये उकळवले पाहिजे. तसेच दुधाचा टोप हा वारंवार बदलु नये.
पॅकेज्ड दूध जास्त काळ उकळू नये असा सल्ला तज्ञ देतात. कारण पाश्चराइज्ड दूध पुन्हा गरम करण्याची आवश्यकता नसते. ते पुन्हा गरम केल्याने त्याचे पौष्टिक मूल्य कमी होते.



























































