
मुंबई ः महाराष्ट्रावर दुहेरी संकट कोसळणार आहे. आधीच पारा 40 अंशांच्या वर गेल्याने उन्हाच्या तडाख्याने राज्यातील अनेक जिह्यांना होरपळून काढले असताना आता अवकाळीचाही इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कोकण, मराठवाडय़ातील काही जिह्यांमध्ये पुढील तीन दिवस वादळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.



























































