
पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर पाणी साचण्याला केवळ मुंबई महापालिकेला जबाबदार धरता येणार नाही. अतिक्रमणे, गटारे तुंबविणे आणि सार्वजनिक सुविधांचा गैरवापर यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून, ही आपणच निर्माण केलेली समस्या असल्याचे निरीक्षण हायकोर्टाने आज नोंदवले. हायकोर्टाबाहेरील फुटपाथ झेरॉक्स दुकाने, चहा व ज्यूस स्टॉलने व्यापल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.





























































