Live: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. आजपासून सुरू होत असणाऱ्या या अधिवेशनात काय घडणार याकडे साऱ्यांचं लक्षं आहे. या अधिवेशनात राज्यातील अनेक प्रश्नांवर चर्चा होणार आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा गट सत्तेत आला असला तरी राज्यात पावसाची कमी, रखडलेल्या पेरण्या, बेरोजगारी, नोकर भरतीचे प्रश्न, वाढती महागाई, सरकारकडून सुरू असलेली उधळपट्टी यामुळे सत्ताधाऱ्यांची चांगलीच पंचाईत होणार असल्याचं दिसत आहे.