पार्टी करणारे कधीच आयपीएल जिंकले नाहीत

आम्ही कधीच पार्टी करत नाही. म्हणूनच आम्ही एक नव्हे तर पाच-पाच आयपीएल ट्रॉफी जिंकलोय आणि दोनदा चॅम्पियन्स लीग ट्रॉफी. मुंबईनेही पाच वेळा हाच पराक्रम केलाय, मात्र दोन-तीन संघ असे आहेत, जे म्हणजे जोरदार पार्टी करतात. ते एकदाही आयपीएल जिंकू शकलेले नाहीत, अशी तिखट प्रतिक्रिया सुरेश रैनाने बंगळुरू, पंजाब आणि दिल्ली संघाबाबत करीत त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. जर तुम्ही रात्री उशिरापर्यंत पार्टी करणार तर सकाळी उठून मॅच कशी खेळणार? असा सवाल करत आमच्या चेन्नई संघात आम्ही उशिरापर्यंत कधीच पार्टी केली नाही. आमच्या संघव्यवस्थापनाचे आमच्यावर लक्ष असायचे. जर आम्ही चांगले खेळलो नाही तर आम्हाला आमचा कर्णधार का संघात निवडेल? आता मी मुक्त झालो आहे आणि आता मी निवृत्तही झालो असल्याचे रैनाने सांगितले.