ऐतिहासिक चांद्रयान 3 मोहिमेच्या यशानिमित्त तिरंग्याची मिरवणूक काढत नागरिकांचा जल्लोष

संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या चांद्रयान 3 मोहिम आज यशस्वी झाली.या गौरवशाली क्षणाचा साक्षीदार होत परळीत नागरिकांकडून फटाके फोडत जल्लोष करण्यात आला. यावेळी एकमेकांना पेढे भरवत शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली.

राणी लक्ष्मीबाई टॉवर समोर चांद्रयान 3 मोहिमेच्या यशाबद्दल नागरिकांनी आज आनंदोत्सव साजरा केला. सायंकाळी 6 च्या सुमारास विक्रम लेंडर चंद्रावर सुखरूप उतरल्याचे इस्रोने सांगितले. देशाचे शास्त्रज्ञ यांचे नागरिकांनी अभिनंदन केले. जबतक सूरज चांद रहेगा हिंदुस्थान तेरा नाम रहेगा,भारत माता की जय,वंदे मातरम् अशा घोषणांनी टॉवर परिसर दुमदुमून गेला होता.यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.