पाचशे रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी तलाठ्यावर गुन्हा 

प्रातिनिधिक फोटो
वडीलांच्या निधनानंतर जमीन मिळकतीचा वारस तपास होऊन नाव दाखल करण्यासाठी पाचशे रूपयांची लाच मागितल्या प्रकरणी  तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे.
जमिनीचा वारस तपास करून तक्रारदाराचे नाव दाखल होण्यासाठी शिवतर येथील तलाठी अमोल पाटील यांने 1 हजार रूपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला.त्यावेळी 500 रूपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.अमोल पाटीलवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिली.