तीन लाखांचे 19 मोबाईल तक्रारदारांना केले परत, कोतवाली पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक

कोतवाली पोलिसांनी चोरीला गेलेले व गहाळ झालेले महागडे मोबाईल तक्रारदारांना परत केले आहेत. कोतवाली पोलिसांनी विशेष मोहीम राबवून तांत्रिक बाबींचा तपास करून चोरी गेलेले 19 मोबाईल हस्तगत केले. दोन लाख 93 हजार 300 रुपये किमतीचे मोबाईल तक्रारदारांना पोलीस ठाण्यात बोलावून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी परत केले आहेत. गेल्या दोन महिन्यांत साडेचार लाख रुपयांचे मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द केले असून, कोतवाली पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.

मोबाईल चोरीच्या गुह्यांचा तपास करून मोबाईल शोधण्याचे आदेश कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पथकाला दिले होते. कोतवाली पोलिसांनी मोबाईल चोरीच्या दाखल गुह्यांचा तांत्रिक बाबींच्या आधारे सखोल तपास करून चोरीला गेलेले 19 मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. चोरीतील मोबाईल परत मिळाल्यावर कोतवाली पोलिसांनी तक्रारदारांना मोबाईल घेऊन जाण्याचे आवाहन केले होते. तक्रारदारांना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी बोलावून मोबाईल परत केले.

चोरीतील विवो, रेडमी, ओप्पो, सॅमसंग या कंपनीचे मोबाईल फोन परत करण्यात आले आहेत. गेलेला मोबाईल परत मिळेल, ही आशाही अनेकांनी सोडून दिली होती. हरवलेला मोबाईल मिळाल्याचा आनंद नागरिकांच्या चेहऱयावर पाहायला मिळत होता. मोबाईल परत मिळाल्यामुळे तक्रारदारांनी कोतवाली पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सलीम शेख, राजेंद्र फसले व दक्षिण मोबाईल सेलचे प्रशांत राठोड यांनी ही कामगिरी पार पाडली आहे.

मोबाईल यांना मिळाले परत

n दिलीप रंगनाथ गोरे, , दत्तात्रय मधुकर बेट्टी, लहानू मारुती उमाप, धीरज छोटेलाल लड्डा, शेख सादिक अलाउद्दीन, ऋतिक राजेंद्र वाघ, समीर फाटक, भीमा सकट, शंकर गावडे, तुषार खराडे, रिजवान खान, राजेश शिरसाट, करनाराम भांड, सागर जाधव, जय शिंदे, मेहुल सोनी, राजू आहेर, प्रताप थोरात, वैशाली कांडेकर यांना मोबाईल परत देण्यात आले.