नरेंद्र मोदी, अमित शहा घाबरले म्हणून वारंवार….तेजस्वी यादव यांचा निशाणा

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी हे खोटं बोलणारे पंतप्रधान आहेत. आतापर्यंत त्यांनी बिहारबाबत जी काही आश्वासने दिली ती पूर्ण केलेली नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा दोघंही घाबरले आहेत, त्यामुळे वारंवार बिहारला येत असल्याचा जबरदस्त टोला त्यांनी लगावला आहे.

तेजस्वी यादव म्हणाले की, इंडिया आघाडीला बिहारमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आम्ही आधीही सांगितले होते आणि आजही सांगतो की, यावेळी धक्कादायक निकाल असणार आहेत. ही निवडणूक फार महत्त्वाची असून ती संविधान लोकशाही वाचविणारी निवडणूक आहे. भाजप सांगतंय 40 जागा जिंकणार आहोत. पण, ते आता काहीही बोलत आहेत, त्यांना वास्तविक असं म्हणायचं आहे की ते हरत आहेत, अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली.

तेजस्वी यादव म्हणाले की, खोटं हे ओरडून बोलतात जेणेकरून सत्याचा आवाज दबला जाईल असाही टोला त्यांनी यावेळी लगावला.