रोहीत शर्मा, विराट कोहली टी-20 मधून घेणार निवृत्ती?

सध्या टीम इंडिया व ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 ची मालिका सुरू असून यातील पहिला सामना जिंकत टीम इंडियाने यात 1-0 ने आघाडी घेतली आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने नवोदित तरुण खेळाडूंचा संघ तयार केला असून त्याचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. रोहीत शर्मा, विराट कोहली यांच्यासोबत सिनियर खेळाडूंना या मालिकेतून ब्रेक देण्यात आला आहे. मात्र हा ब्रेक कायमचा असल्याचे बोलले जात आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी बीसीसीआयने आतापासूनच कंबर कसली आहे. वर्षभरआधीपासून बीसीसीआयने संघ तयारीला सुरुवात केली आहे. त्यासाठीच बीसीसीआयने त्यामुळे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली तरुण खेळाडूंचा संघ या मालिकेत उतरवण्यात आला आहे. या मालिकेत विराट व रोहीतला आराम देण्यात आला आहे. त्यामुळे आता भविष्यात विराट व रोहीत टी-20 खेळणार की निवृत्ती घेणार अशी चर्चा सुरू आहे.