देशात सर्वत्र भगव्या पक्षाविरोधात जनमानस एकवटले असून भाजप 200 जागाही ओलांडू शकणार नाही, असा दावा तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी रविवारी येथे केला. डायमंड हार्बर येथे एका प्रचार सभेत ते म्हणाले की, देशात भाजपविरोधी भावना वाढत आहे. भाजप 200 जागांचा आकडाही ओलांडू शकत नाही, असे बॅनर्जी म्हणाले. आम्ही आमची आश्वासने पाळतो… गेल्या 10 वर्षांत आम्ही 5580 कोटी रुपये खर्च केले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्टॅटिक सर्व्हिलन्स टीमने दादरमध्ये गस्तीवर असताना सफेद रंगाच्या कारमधून एक लाख 80 हजारांच्या रोकडसह एकाला अटक केली. या प्रकरणी भोईवाडा पोलीस पुढील तपास करत आहेत.