इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत दाखल होताच लालूप्रसाद यांनी केंद्र सरकारविरोधात रणशिंग फुंकले. इंडिया आघाडी एकजूट असून आम्ही केंद्रीतील मोदी सरकार उखडून फेकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी देशभरातील विविध पक्षांचे नेते येत आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीचे भवितव्य उज्ज्वल आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतर इंडिया आघाडीच सत्ता स्थापन करणार आहे. आम्हीच लोकसभा निवडणूक जिंकणार आहोत. इंडिया आघाडी एकजूट असून आम्ही केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार उखडून फेकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
इंडिया आघाडीची बैठक 19 डिसेंबरला होत आहे. या बैठकीसाठी देशभरातील इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे नेते दिल्लीत येत आहेत. या बैठकीचा अजेंडा जाहीर झाला नसला तरी या बैठकीत जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता असल्याने या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या बैठकीसाठी आलेल्या लालूप्रसाद यादव यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.