मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार

देशात लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना दुसरीकडे मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला आहे. कांगपोकपी आणि उखरूल जिह्यात शनिवारी दोन गटांमध्ये झालेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला आहे. दोघेही कुकी समाजाचे असल्याचे समजते.

गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच राज्य सुरक्षा दल आणि केंद्रीय दल घटनास्थळी पाठवण्यात आले. त्यांनी तेथे येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेनंतर कमिटी ऑन ट्रायबल युनिटीने 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत कांगपोकपी जिल्हा बंदचे आवाहन केले आहे.