पै..पै.जोडून मजुराने स्मार्टफोन दिला, मोबाईल मिळताच बायको प्रियकरासोबत पळून गेली

बिहारमधील बांका येथील एका गावात तीन मुलांच्या आईनं तिच्या प्रियकरासोबत पळ काढल्याची घटना घडली आहे. फरार महिलेचा पती नेपाळमध्ये रोजंदारी मजूर म्हणून काम करत आहे. काही दिवसांपूर्वी पती घरी आला होता आणि त्याने 20 हजार रुपयांचा फोन आपल्या बायकोला भेट म्हणून दिला होता. पती कामानिमित्त पुन्हा नेपाळला गेल्यावर आठवडाभरातच त्याची बायको मुलांना सोडून देत प्रियकरासह पळून गेली.

या प्रकरणी महिलेच्या पतीने सांगितले की, नेपाळला पोहोचल्यानंतर काही दिवसांनी त्याने बायकोला फोन केला. मात्र बायकोचा मोबाईल स्वीच ऑफ लागला. त्यानंतर त्यानं शेजाऱ्यांना फोन केला. शेजारच्यांकडून त्याला कळाले की तो राहात असलेल्या गावातील एका तरुणासोबत त्याची बायको पळून गेली आहे. हे कळताच पती आपली सर्व कामे सोडून घरी परतला. मी माझ्या बायकोला सतत फोन करत होतो, म्हणून माझ्या पत्नीने माझा नंबर ब्लॉक केला. मला तीन मुले आहेत, त्याना सोडून आपली बायको पळून गेली असं या माणसाने पोलिसांना सांगितलं आहे. या माणसाने अमरपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

पोलीस निरीक्षक विनोद कुमार यांनी या घटनेबाबात माहिती देताना सांगितले की,”तीन मुलांची आई गावातून फरार झाली आहे. या प्रकरणी महिलेच्या पतीने लेखी अर्ज दिला आहे. आम्ही पत्नीचा मोबाईल नंबर सायबर टीमला पाठवला आहे. प्रकरणाचा तपास सुरू करण्यात सुरू आहे. प्रियकरासोबत पळून गेलेल्या महिलेची तीन मुले त्यांचा सांभाळ महिलेचा नवरा करत आहे.