हरवलेले 45 मोबाईल शोधण्यास सायबर पोलीसांना यश

गेल्या आठ महिन्यात हरवलेल्या आणि गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यात रत्नागिरी सायबर पोलीसांना यश आले आहे. रत्नागिरी सायबर पोलीसांनी हरवलेले 45 मोबाईल शोधले आहेत. हे मोबाईल पुन्हा मूळ मालकांना देण्यात आले आहेत.

सप्टेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत गहाळ झालेल्या सर्व मोबाईलची माहिती सायबर पोलीस ठाण्याने घेतली. सायबर पोलीस ठाण्याचे निरिक्षक अमित यादव, सहाय्यक निरिक्षक नितीन पुरळकर, दुर्वा शेट्ये, रमीज शेख, नीलेश शेलार आणि अन्य पोलीस ठाण्याच्या अंमलदारांनी एकत्र काम करून हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला. हरवलेले 45 मोबाईल शोधण्यात पोलीसांना यश आले. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते मूळ मालकांना मोबाईल परत करण्यात आले.