जम्मू-कश्मीरमधील वातावरण शांततापूर्ण असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत असलं तरी स्थानिक नागरिकाच्या मृत्यूनंतर प्रत्यक्षात अनेक भागात तणावाचं वातावरण आहे.
दरम्यान, जम्मू-कश्मीरमधील नागरिकाच्या मृत्यूची लष्कर चौकशी करत असताना ब्रिगेडियर दर्जाच्या अधिकाऱ्याकडून काम काढून घेतल्याची माहिती समोर येत आहे. या अधिकाऱ्याला पूंछ क्षेत्राच्या बाहेर पाठवल्याची सूत्रांची माहिती असल्याचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे.