
मराठा आरक्षणासाठी राज्यात झालेल्या आंदोलनामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या वारसांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये (एमआयडीसी) नोकरी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी अलीकडेच विविध मागण्यांसाठी उपोषण केले होते. मराठा आंदोलनातील शहीदांच्या वारसांना नोकरी देण्यात यावी अशीही त्यांची मागणी होती. ती राज्य शासनाने मान्य केली होती.





























































