मिंधे-भाजप राजवट म्हणजे सध्याची मुघलाईच, आदित्य ठाकरे यांची टीका

जालना मधील अंबड येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्ज वरून राज्यभरातून राज्य सरकारवर टीका होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी या लाठीचार्ज चा निषेध करत राज्य सरकारवर टीका केली आहे

”महाराष्ट्रात स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करणंही अशक्य झालंय, दडपशाही करणारं मिंधे भाजपा सरकार युवकांच्या जीवावर उठलंय! जालन्यात आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या समुदायावर झालेला लाठी हल्ला हा संतापजनक आहे. लोकशाही पद्धती चिरडून हुकूमशाहीच्या दिशेना वाटचाल सुरु आहे. पहिला हल्ला वारकऱ्यांवर, आता मराठा समाजातील तरुणांवर… मिंधे-भाजपा राजवट म्हणजे सध्याची मुघलाईच! आपलं राज्य लूटायचं, दिल्लीसमोर राज्य झुकवायचं, सरकारं पाडायची… निर्लज्जपणाचा कळस गाठलाय! पण महाराष्ट्र फार काळ हे सहन करणार नाही, परिवर्तन अटळ आहे!” असे ट्विट करत आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.