चंद्रपूर शहरातील पूर आता ओसरण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या 18 तासापासून चंद्रपुरात पावसाने विश्रांती घेतली आहे. यासोबतच गोदावरी नदी खोऱ्यात पर्जन्यवृष्टी नसल्याने नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात पाणी तेलंगणाकडे प्रवाहित होत आहे. परिणामी उपनद्या असलेल्या वर्धा- प्राणहिता- वैनगंगा या नद्यांमधील पाणी पुढे प्रवाहित होत असल्याने चंद्रपूर शहरातील पूर परिस्थितीत सुधार होत आहे. पाणी ओसरण्याची गती मात्र धीमी आहे. पुढच्या 24 तासात हे पाणी पुन्हा एकदा नदीपात्रात जाण्याची शक्यता आहे. चंद्रपूर महानगरपालिकेने आतापर्यंत सुमारे सातशे नागरिकांना बोटीद्वारे बचाव करत सुरक्षित स्थळी पोहोचविले आहे.
चंद्रपूर शहरातील पूर ओसरण्यास सुरुवात #SaamanaOnline #Chandrapur pic.twitter.com/F9z0vtgGQx
— Saamana (@SaamanaOnline) July 29, 2023