मध्य प्रदेशात ईडीच्या धाडी का पडत नाहीत?

ईडी विरोधकांच्या घरी पोहोचते. परंतु मध्य प्रदेशात इतके मोठमोठे घोटाळे होऊनही ईडी या ठिकाणी का पोहोचत नाही? मध्य प्रदेशात ईडी धाड का मारत नाही? मध्य प्रदेशातील महाकालच्या कॉरिडॉरमध्ये घोटाळा झाला, व्यापाम घोटाळा झाला, भाजपने देवाच्या मूर्तीतही घोटाळा केला, याचा तपास ईडी का करीत नाही, असा संतप्त सवाल काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी गुरुवारी केला.