जय जय स्वामी समर्थ; गाठला एक हजार भागांचा टप्पा

कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेने उत्कृष्ट कथानकाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नुकतेच या मालिकेने 1000 भागांचा टप्पा गाठला. यानिमित्ताने  सहस्र भागपूर्तीचा आनंद सोहळा आयोजित केला होता.

या वेळी रेणुका शहाणे, सचिन पिळगावकर, अली अजगर, तुषार दळवी, अतुल परचुरे, निर्मिती सावंत, सुनील बर्वे, मानव नाईक, सुनील तावडे आदी उपस्थित होते. मालिकेतील कलाकार अक्षय मुडावदकर, स्वानंद बर्वे, राधाक्का, आचार्य यांना सन्मानित करण्यात आले. रेणुका शहाणे, सचिन पिळगावकर, निर्मिती सावंत या कलाकारांनी स्वामींबद्दलचे अनुभव कथन केले.