तुरुंगवारी टाळण्यासाठीच केरळच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपाशी समझोता केला; प्रियांका गांधी यांचा हल्ला

केरळचे मुख्यमंत्री पनरई विजयन यांनी तुरुंगवारी टाळण्यासाठीच भाजपाशी समझोता केला, अशा शब्दांत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचारसभेत जोरदार हल्ला केला. अनेक घोटाळे बाहेर येऊनही मोदी सरकारने विजयन यांच्याविरोधात कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नसल्याकडे प्रियंका गांधी यांनी लक्ष वेधले.

माकपाच्या ज्येष्ठ नेत्यांचे अनेक घोटाळे समोर आले आहेत. परंतु नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील पेंद्र सरकारने त्यांच्या विरोधात अद्याप कारवाई केलेली नसल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला. केरळचे मुख्यमंत्री राहुल गांधी यांच्यावर आरोप करतात, पण भाजपाविरोधात अवाक्षरही काढत नाहीत. जेव्हा कुणी योग्य व्यक्ती मैदानात उतरतो तेव्हा त्याच्याविरोधात सर्व शक्ती एकत्र येतात, असे प्रियंका गांधी म्हणाल्या. दरम्यान, राहुल गांधी पुन्हा एकदा काँग्रेसकडून वायनाड येथून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.