गावकऱयांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळले; गडचिरोलीतील घटना

जादूटोण्याच्या संशयावरून एका महिलेसह दोघा जणांना गावकऱयांनी निर्दयपणे मारहाण करून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना गडचिरोली जिह्यातील बर्सेवाडा येथे घडली.

या घटनेत जमनी तेलामी (52) आणि देऊ आतलामी (60) यांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी पोलिसांनी 15 जणांना अटक केली. आरोपींमध्ये मृत जमनी हिचा पती देवाजी तेलामी (60) व मुलगा दिवाकर तेलामी (28) यांचा समावेश आहे. दोन वर्षांपूर्वी या गावातील एका बालकाचा मृत्यू झाला होता. या बालकाचा मृत्यू जादूटोण्यामुळे झाल्याचा आरोप करत गावातील काही लोकांनी 1 मे रोजी पंचायत बोलावली. संतप्त गावकऱयांनी जमनी आणि देऊ यांना मारहाण करत पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले.