लोकसभा निवडणूकींच्या तारखांची घोषणा शनिवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. देशभरात 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान सात टप्प्यात निवडणूका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी जनतेला एक आवाहन केले आहे.
अखेर लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा झाली! देशात हुकूमशाही आणून संविधान संपवू पाहणाऱ्यांना घरी बसवण्याची संधी जवळ आली!
आता चुकायचं नाही,
हटायचं नाही,
मागे फिरायचं नाही!
प्रत्येकाने सज्ज व्हायचं,
महाराष्ट्र हित हेच खरं देश हित,
हे लक्षात ठेवायचं!
महाराष्ट्रासाठी आणि
देशासाठी…— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 16, 2024
”अखेर लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा झाली! देशात हुकूमशाही आणून संविधान संपवू पाहणाऱ्यांना घरी बसवण्याची संधी जवळ आली! आता चुकायचं नाही, हटायचं नाही, मागे फिरायचं नाही! प्रत्येकाने सज्ज व्हायचं, महाराष्ट्र हित हेच खरं देश हित, हे लक्षात ठेवायचं! महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी लढायचं, विजयी व्हायचं! गद्दारांना आणि हुकूमशहांना गाडायचंच”, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी जनतेला केले आहे.