नवनीत राणा यांच्या पराभवामध्ये रवी राणा यांचा मोठा हातभार असेल, बच्चू कडूंची टीका

अमरावती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे उभे असून नवनीत राणा या भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. तर बच्चू कडू यांनी देखील प्रहारमधून दिनेश बुब यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. नवनीत राणा यांचा पराभव झाला तर त्यात सर्वात मोठा हातभार रवी राणा यांचाच असेल, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.

रवी राणा यांनी दोन दिवसांपूर्वी उमेदवार दिनेश बुब यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेवर बच्चू कडू यांनी जोरदार प्रत्युत्तर केलं आहे. रवी राणा यांनी इतक्या खालच्या पातळीवर उतरून प्रचार करू नये. ज्यांचं खर मातीचं असतं त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नयेत. आम्ही जर चित्रपटातील सीन काढले तर पिताना दिसतात. त्याचे समाज मनावर काय परिणाम होतात ते पाहिलं पाहिजे. रवी राणा यांनी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ नये. शेवटचे चार ते पाच दिवस राहिले आहेत. आम्ही जर खोलात हात टाकायला गेलो तर अडचण होईल, अशी टीका बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्यावर केली.

नवनीत राणा यांन पाडण्यासाठी सर्वात मोठा हातभार कोणाचा असेल तर तो रवी राणांचा आहे, त्यांची जी भाषा आहे आणि ते व्यवस्थित वागले असते तर ही वेळ आली नसती, पण आता नवनीत राणा यांना निवडणुकीमध्ये पाडण्याचे श्रेय रवी राणा यांना जाईल, असा निशाणा बच्चू कडू यांनी साधला आहे.