महाराष्ट्रातील जे उत्तम ते छिनन्याचा सर्व बाजूंनी प्रयत्न सुरू – राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज रायगड येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी रायगड, खालापूर, अलिबाग या आणि इतर परिसरातील जमिनीच्या प्रश्नाविषयी महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. त्याचवेळी जे जे महाराष्ट्रातील उत्तम आहे ते ते छिनन्याचा सर्व बाजूंनी प्रयत्न सु्रू असल्याचं राज ठाकरे म्हणाले. थोडक्यात पैसे देऊन बलात्कार सुरू आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, असं देखील राज ठाकरे म्हणाले.

पुढे ठाणे जिल्ह्याबद्दल बोलताना तिथल्या लोकांनी लोकसंख्या वाढवली नसून बाहेरून आलेल्या लोकांमुळे नगर पालिकांच्या महानगर पालिका झाल्याचं राज ठाकरे म्हणाले. हे आपल्यावरचं आक्रमण असल्याचंही त्यांनी म्हटलं. ते लोक नुसतं येत नाही तर तुमचं सत्त्व तुम्ही विसरत जात आहात आणि नंतर पश्चातापाचा हात कपाळावर मारण्याशिवाय काही नसेल असा इशारा देखील त्यांनी दिला.