#LokSabhaElection2024 च्या पहिल्या टप्प्याला आज सुरुवात झाली. अंगाची लाहीलाही करणाऱ्या या प्रचंड उन्हात देखील नागरिक मोठ्या प्रमाणात मतदान करताना पाहायला मिळत आहे. या प्रक्रियेला गालबोट लागेल अशी कोणतीही घटना आतापर्यंत समोर आलेली नाही. अशातच राजस्थानमधील काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी मोठा दावा केला. राजस्थानमध्ये काँग्रेस भाजपला मागे टाकेल इतकेच नाही तर देशात INDIA आघाडी ही 272 चा बहुमताचा आकडा पार करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
एएनआय सोबत बोलताना त्यांनी असा दावा केला आहे. काँग्रेस नेते सचिन पायलट म्हणाले की, ‘संपूर्ण देशात आणि राज्यात बदलाचे वातावरण आहे. मी जे पाहतोय त्यावरून मला वाटतं की काँग्रेसची कामगिरी पूर्वीपेक्षा खूप चांगली होईल आणि 4 जून रोजी INDIA आघाडीला बहुमत मिळेल. …200, 300, 500 जागा ओलांडण्याची हमी देण्यात काही अर्थ नाही. मी एवढेच सांगू शकतो की, राजस्थानमध्ये काँग्रेस भाजपला मागे टाकेल. आणि देशात INDIA आघाडी 272 जागांचा बहुमताचा आकडा पार करेल. आपला देशातील नागरिक खूप हुशार आहेत’.
यापुढे बोलताना ते म्हणाले की, ‘ज्या ठिकाणी भाजप थेट आमच्या विरोधात लढत आहे तिथे काँग्रेसचा स्ट्राइक रेट चांगला असेल…’
#WATCH Jaipur, Rajasthan: Congress leader Sachin Pilot says, “There is an atmosphere of change in the entire country and state and based on what I am seeing, I think that the performance of Congress will be much better than before and INDIA alliance will get a majority on June… pic.twitter.com/pvAhLD27O8
— ANI (@ANI) April 19, 2024