तेलंगणात सात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या

 

तेलंगणातील 12 वी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या 30 तासांत राज्यातील सात विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आत्महत्या करणाऱयांमध्ये सहा मुलींचा समावेश आहे. हैदराबादच्या राजेंद्रनगर, खम्मम, मेहबुबाबाद, कोल्लूर या जिह्यांतील विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. पास होवो की नापास, परंतु विद्यार्थ्यांनी आत्महत्या करू नये, असे वारंवार शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे.