गेल्या महिनाभरात राहुल गांधींनी 103 वेळा अदानी आणि 30 वेळा अंबानींचे नाव घेतले, काँग्रेसचा पलटवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी एका सभेत बोलताना राहुल गांधी यांच्यावर टीका केली. काँग्रेसने अदानी व अंबानी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याचा आरोप मोदींनी केला आहे. हा आरोप करताना मोदी म्हणाले की निवडणूक येताचा राजकुमारांनी अदानी व अंबानींचं नाव घेणं बंद केलं आहे. त्यावरून आता काँग्रेसने आता पलटवार केला आहे.

”निवडणुकीच्या तीन टप्प्यांनंतर नरेंद्र मोदी इतके चिडले की ते आता अदानी-अंबानींच्या विरोधात बोलू लागले आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले- राहुल गांधी अदानी-अंबानींचे नाव घेत नाहीत. सत्य हे आहे 3 एप्रिलपासून आतापर्यंत राहुल गांधींनी 103 वेळा अदानी आणि 30 वेळा अंबानींचे नाव घेतले आहे, असे काँग्रेसने स्पष्ट करत मोदींवर पलटवार केला आहे.