राज्यात महायुती सक्षम असल्यामुळे राज ठाकरे यांच्या पाठिंब्याची गरज नव्हती. मात्र त्यांनी पाठिंबा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांचा किती फायदा होईल हे दिसेलच, असे रिपाइं नेते, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला त्याचे मी स्वागत करतो. मात्र, त्यांच्या पाठिंब्याचा किती फायदा होईल हे आताच सांगता येणार नाही. विधानसभा निवडणुकीत त्यांना महायुतीमध्ये जागा देण्याचे आश्वासन देण्यात आले असेल. त्यामुळे त्यांनी पाठिंबा दिला असावा, अशी प्रतिक्रिया आठवले यांनी माध्यमांशी बोलताना दिली.