सिर्फ इक कदम उठा था गलत राह-ए-शौक़ में, अमिषा पटेलने सांगितली करिअरमधील मोठी चूक

‘गदर 2’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालत असून अनेक हिट सिनेमाांचे विक्रम मोडले आहेत. या सिनेमातून अभिनेत्री अमिषा पटेलने पाच वर्षानंतर कमबॅक केले आहे. आता अमिषाने एका मुलाखतीत तिच्या या सिनेमाबाबत बोलताना तिच्या करिअरबाबत मोठा खुलासा केला आहे. ती म्हणाली करिअरच्या उंचीवर असतानाही त्यावेळी केलेल्या चूकीमुळे मोठमोठे सिनेमा हातातून गेल्याची तिने यावेळी खंत व्यक्त केली.

अमीषा पटेलने 5 वर्षाच्या मोठ्या ब्रेकनंतर ‘गदर 2’ मधून पुन्हा पदार्पण केले आहे आणि तिच्या कमबॅक केलेल्या सिनेमा ने 500 कोटींची कमाई केली आहे. सिनेमाच्या यशानंतर अमिषा पटेलने नुकतेच आपल्या करिअरबाबत मोठा खुलासा केला आहे. ती म्हणाली, तिला आता इंडस्ट्रीतील सिनेनिर्मात्यांसोबत काम न केल्याचा पश्चाताप होत आहे. तिने आपल्या मॅनेजरमुळे संजय लीला भन्साळी सारख्या फिल्ममेकर सोबत काम करु शकले नाही. सिद्धार्थ कनन याच्यासोबतच्या मुलाखतीत अमिषाने सांगितली, आमच्यामध्ये खूप प्रोजक्टबाबत चर्चा झाली होती. आता सिनेमाचे नाव नाही सांगत, कारण सिनेमा आधीच बनलेला आहे. त्यावर बोलण्यात आता काही अर्थ नाही.

त्यावेळी माझे मॅनेजर आणि संजय लीला भन्साळी यांच्यामध्ये थोडा वाद होता. ज्यावेळी माझी मॅनेजर आणि मी वेगळे झालो त्यावेळी संजय लीला भन्साळी म्हणाले होते की, अशा अनेक संधी होत्या, ज्यावेळी आपण एकत्र काम करु शकत होतो. मात्र त्यांनी सांगितले की, तिच्या मॅनेजरसोबत ते डिल करु शकत नव्हते. एवढेच नाही तर यश राज फिल्म, साजिद नाडियाडवाला आणि अनेकांनी मला हेच सांगितले की, तिच्या मॅनेजरमुळे त्यांना अप्रोच करायला घाबरायचे. माझ्या नियोजन अभावी अनेक सिनेमे हातातून घालवले. अनेक दिग्दर्शक, निर्मात्यांसोबत काम करण्याची संधी हुकली, मात्र हेच माझे नशीब होते. सध्या अमीषा ‘गदर 2’ चे यश साजरे करत आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन 25 उलटले तरी सिनेमागृहांमध्ये क्रेझ कायम आहे.