Maratha Protest Lathicharge कोणाच्या सांगण्यावरून लाठीचार्ज केला? अंबादास दानवे यांचा संतप्त सवाल

जालन्यातील अंतवाली सराटी गावात आंदोलनाला बसलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. या लाठिचार्जात काही जण जखमी झाले आहेत. त्यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला संतप्त सवाल केला आहे.

”जालन्यतील अंतरवाली सराटी या गावात मराठा समाजाचे आंदोलन मोडून काढण्यात पोलिसांनी बळाचा, बेछूट लाठीचा वापर केला आहे. हवेत गोळीबरही केल्याचे वृत्त आहे. याचा मी निषेध करतो. शांततेने आंदोलन सुरू असताना ते दडपण्यासाठी केलेली ही कृती कोणाच्या सांगण्यावरून केली गेली याचे उत्तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यायला हवे” असे ट्विट अंबादास दानवे यांनी केले आहे.