ही तर विश्वगुरूंची कृपा, अंबादास दानवे यांची टीका

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. दानवे यांनी त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी अदानी व अंबानीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

”देशाचे नेते विश्वगुरू म्हटलं जातं अजून अदानीच्या प्रश्नावर यांनी तोंड उघडलेलं नाही. कारण काही लोकं म्हणतात की यांचं नाव पुढे करून हेच लोक सर्व गोष्ट करत आहेत. म्हणून आज सगळ्याच ठिकाणी अदानी अंबानी, कुठेही जा पेट्रोल पंप त्यांचा, एअरपोर्ट त्यांचा, रेल्वे, बसही दिली जाईल लाईट त्यांच्याकडे, रेडीओ त्यांच्याकडे, आकाशवाणी, टीव्हीचे चॅनल्स त्यांच्याकडेच. सगळा देश त्यांच्याकडे दिला जाईल. जनतेच्या हातात काही राहणार नाही. याला कृपा विश्वगुरू, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे” असे अंबादास दानवे यांनी त्या व्हिडीओत म्हटले आहे.

या व्हिडीओसोबत त्यांनी एक पोस्टही शेअर केली आहे. ”देशातील जनतेच्या हाती आलेल्या सार्वजनिक मालमत्ता आता फक्त दोन लोकांना आंदण म्हणून देण्यात येत आहेत. एक अदानी.. दुसरे अंबानी! या दोन अडनावांबद्दल प्रश्न विचारला की भाजपचा रक्तदाब वाढतो आणि प्रश्न विचारणाऱ्याची खासदारकी रद्द केली जाते. याचा हिशोब आपण कधी विचारणार आहोत का?” असा सवाल दानवे यांनी या पोस्टमधून केला आहे.