महाराष्ट्रात पाच टप्प्यांत होणार मतदान; तुमच्या मतदारसंघात कधी? वाचा…

केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदान होणार असून या निवडणुकांचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. महाराष्ट्राचा पहिला टप्पा 19 एप्रिल रोजी होणार असून दुसरा टप्पा 26 एप्रिल, तिसरा टप्पा 7 मे, चौथा टप्पा 13 मे आणि पाचवा टप्पा 20 मे रोजी होणार आहे.

– पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

– दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

– तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

– चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

– पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ