उपचार शरीरावर; मन कोरडंच!

>> प्रसाद कुळकर्णी

आजची तरुण पिढी अकाली वार्धक्याने ग्रासलेली दिसते. अविरत ताणांमुळे या पिढीमधला मृत्यूदर वाढू लागलाय. ही सगळी कशाची लक्षणं आहेत ? मन, शरीर या दोघांनाही पौष्टिक आणि त्यांच्या योग्य वाढीसाठी आणि तरुण राहण्यासाठी गरजेचं मिळत नाही, पण जे नको ते मात्र वेळी-अवेळी मिळत राहतं. अखेर दोघंही थकतात. मेंदू काम करणं बंद करतो आणि शरीर एक थकलेला गोळा होऊन जातं. मग आपण डॉक्टरांकडे धावलो तरी उपचार शरीरावर होतात आणि मन मात्र तसंच कोरडं राहतं.

आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस इतका व्यस्त झालाय की, त्याला स्वतःकडे, स्वतःच्या आरोग्याकडे, योग्य आणि पौष्टिक आहाराकडे लक्ष द्यायला वेळच नाही. मग मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणं तर दूरच राहिलं. सध्या तो ज्या प्रकारच्या आयुष्यातून प्रवास करतोय किंवा ज्या प्रकारचं आयुष्य जगतोय ते त्याला मान्य नसलं तरी ते जगण्याला तो बांधील आहे.

आपण यापूर्वीही अनेकदा वर्तमानपत्रांतून वाचलेलं आहे की, ‘कुणी पोलिसाने स्वतःला गोळी मारून किंवा गळफास लावून आत्महत्या केली. कारण कामाचा प्रचंड ताण हे असावे.’ म्हणजे हा ताण किती वाढत चाललाय पहा की, माणूस मानसिक निराशेमुळे मृत्यू जवळ करतोय. हा झाला ताणाचा एक प्रकार, तर दुसरा मोठमोठय़ा पंपन्यांमध्ये कर्मचाऱयांना, अधिकाऱयांना दिलेल्या कामाचे लक्ष्य – (target) पूर्ण करण्याचा ताण.
अर्थात काम कोणतंही असो, त्या कामाचा आनंद घेत ते पूर्णत्वाला नेणं महत्त्वाचं. आता कामाचा आनंद घेत एका ठरावीक काळापर्यंत आपण ते करू शकतो. शरीर आणि मन कधीतरी थकणारच. मग शरीर थकल्यावर आपण काय करतो? आराम करतो, विश्रांती घेतो, काही वेळ शांत पडून राहतो किंवा निवांत झोप घेतो. थोडी वेळ का होईना ती व्यवस्थित आणि निवांत मिळाली की, आपण ताजेतवाने होऊन पुन्हा कामाला लागू शकतो. हे झाले शरीराच्या बाबतीत.

आता मन थकल्यावर आपण काय करतो? अगदी नेमपं सांगायचं तर काहीच करत नाही. मन थकतं म्हणजे तरी काय? तर जे काम आपण करत असतो ते व्यवस्थित होत नाही, काहीतरी गडबड, चिडचिड होऊ लागते, काहीच सुचत नाही, कामात आपण एकरूप होऊ शकत नाही. या सगळय़ा मन थकल्याचा जाणिवा आहेत. खरं म्हणजे या जाणिवा होऊ लागल्यावर आपण अनिवार्यपणे काही वेळ त्या कामातून पूर्णपणे बाहेर येऊन मनाला दुसरा काही विरंगुळा किंवा मनाला दुसऱया एखाद्या आपल्या आवडीच्या विषयात गुंतवलं पाहिजे. आवडीची गोष्ट मिळाल्यामुळे मन प्रफुल्लित होतं, त्यावरचा ताण हलका होतो आणि ते पुन्हा नव्या जोमाने कामात रस घेऊ लागतं. म्हणजे मुद्दा काय? तर मन हे अगदी लहान-लहान गोष्टींमुळे आनंदीत, प्रफुल्लित होऊ शकते.

आता तसं पाहिलं तर शास्त्राrयदृष्टय़ा मन नावाचा कोणताही अवयव शरीरात कुठेही नाही. मग मन आनंदित झालं, माझ्या मनात आलं, मन भरून आलं, मन प्रसन्न झालं म्हणजे नेमपं काय झालं? थोडक्यात सांगायचं तर जाणीव आणि बुद्धी यामुळे घडणाऱया ज्ञान, विचार, स्मरणशक्ती, भावना, चेतना या गोष्टी जिथे होतात त्या ठिकाणाला मन असं म्हणता येईल. आपल्या मनात आलेल्या भावभावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचायच्या असतील तर तिथेही एक जागृत मन असायला हवं. म्हणजेच या सुंदर भावना निर्माण होण्यासाठी आणि त्या दुसऱया व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आधी आपलं स्वतःचं मन प्रफुल्लित असायला हवं.

अगदी सोपं उदाहरण देतो. ऑफिसमध्ये आपल्याला एखाद्या प्रकल्पाची जबाबदारी दिलेली असते. ती पूर्ण करून त्या प्रकल्पाचं सादरीकरणही करायचं असतं. आता प्रकल्प तयार करत असताना तो जास्तीत जास्त परिणामकारक कसा होईल आणि सादरीकरण करताना त्याची परिणामकारकता ऐकणाऱया, पाहणाऱया व्यक्तीवर किंवा ग्राहकांवर जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कशी करता येईल यासाठी तो प्रकल्प आधी आपल्या मनात रुजायला हवा, समजायला हवा तर आणि तरच त्याचा प्रभाव आपण समोरच्यावर पाडू शकतो. म्हणजेच पुन्हा आपण फिरून तिथेच येतोय की, मनाची काळजी घेणं, मन तंदुरुस्त ठेवणं, त्यांची योग्य प्रकारे मशागत करणं आणि मनाला इजा होऊ नये हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे.

आता मानसिक स्वास्थ्य बिघडणं म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीचा कळत-नकळत मनावर आणि पर्यायाने मेंदूवर पगडा बसणे. मन स्थिर असेपर्यंत आपले विचार नेमक्या दिशेने प्रवास करत असतात. त्यामुळे निकालही योग्य मिळत असतो. एकदा का मनावरचं दडपण वाढू लागलं की, या विचारांची दिशा स्वैर होऊ लागते. त्यामध्ये तारतम्य राहत नाही. मनात अनेक चित्रविचित्र विचार उभे राहू लागतात. त्यांचा ताण वाढू लागतो. परिणामी सारासार विवेकबुद्धी नष्ट होऊ लागते आणि अखेर माणूस वेडापिसा होऊन जातो. या सगळय़ाचा शेवट काहींची मानसिक स्थिरता नष्ट होऊन ते विचित्र वागू लागतात, कुणी नशेच्या आहारी जातात, तर कुणी आत्महत्या करून आपलं जीवन संपवून टाकतात.

आज अगदी प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक ताणतणाव आहेत. माणसाचं जीवनच या तणावांनी भरून गेलेलं आहे. आजचा दिवस पार पडला, उद्याचं काय? अशा वातावरणात माणूस जगतोय. आठवडय़ाचा शेवट कसा संपतो कळतही नाही आणि पुन्हा धबडगा सुरू होतो. कामाच्या प्रचंड ताणामध्ये विरंगुळय़ाचे क्षण वेचायला त्याच्याकडे वेळच नाही म्हणा किंवा त्यासाठी तो वेळ काढतच नाही. शालेय जीवनापासून ते अगदी निवृत्त होईपर्यंत तो टांग्याला बांधलेल्या घोडय़ासारखा डोळय़ांना झापडं लावून पळतच असतो. जे काही जीवनात स्वीकारतो ते त्याच्या मनाला भावलेलं, आवडलेलं असतं का? हा विचार करण्यासाठीसुद्धा त्याच्याकडे वेळ नसतो. आजची तरुण पिढी अकाली वार्धक्याने ग्रासलेली दिसते. अविरत ताणांमुळे या पिढीमधला मृत्यूदर वाढू लागलाय. ही सगळी कशाची लक्षणं आहेत ? मन, शरीर या दोघांनाही पौष्टिक आणि त्यांच्या योग्य वाढीसाठी आणि तरुण राहण्यासाठी गरजेचं मिळत नाही, पण जे नको ते मात्र वेळी-अवेळी मिळत राहतं. अखेर दोघंही थकतात. मेंदू काम करणं बंद करतो आणि शरीर एक थकलेला गोळा होऊन जातं. मग आपण डॉक्टरांकडे धावलो तरी उपचार शरीरावर होतात आणि मन मात्र तसंच कोरडं राहतं.