अधिकार आहे पण जबाबदारी नाही, भत्ते आहेत पण काम नाही! खाते वाटपाच्या मुद्द्यांवरून आदित्य ठाकरेंनी लगावला टोला

राज्यातील अभूतपूर्व राजकीय परिस्थितीवरून देशभरात इथल्या राजकारणाची चर्चा सुरू आहे. मिंधे गटाला बाजूला सारत अजित पवार यांच्या सोबत आलेल्या राष्ट्रवादीतील नेत्यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेतलं आहे. मात्र मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांना अद्याप खाते वाटप करून देण्यात आलेलं नाही. यावरून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून सणसणीत टोला लगावला आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर लिहिलं आहे. ‘9 नवीन मंत्र्यांनी 8 दिवसांपूर्वी शपथ घेतली. अद्याप कोणतेही पोर्टफोलिओ जाहीर केलेले नाहीत. त्यांना अधिकार आहे पण जबाबदारी नाही, आणि भत्ते आहेत पण काम नाही.

दरम्यान, मूळ गद्दार वर्षभरापासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत आहेत, आता मिंधे-भाजपच्या खोके सरकारसाठी त्यांची खरी ‘किम्मत’ काय आहे ते पहा’.