पंतप्रधानांवर टीका करताना आक्षेपार्ह शब्दांचा वापर टाळा, निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना सल्ला

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सल्ला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह शब्दांचा वापर टाळावा, असा सल्ला आयोगाने दिला आहे.

गेल्या वर्षी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आयोगाने गांधी यांना स्टार प्रचारक आणि नेत्यांसाठी जारी केलेल्या सूचनांचे पालन करण्याविषयी म्हटलं आहे. एक मार्च रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचीत आयोगाने राजकीय पक्ष, उमेदवार आणि त्यांच्या प्रचारासाठी येणारे स्टार प्रचारक यांना आचार संहितेच्या उल्लंघनासाठी कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल, असंही आयोगाने म्हटलं आहे.