पाच किलो रेशनमुळे भविष्य सुधारणार नाही; प्रियंका गांधी यांचा मोदी सरकारला टोला

5 किलो रेशनमुळे लोकांचे, तरुणांचे भविष्य सुधारणार नाही, तुम्ही आत्मनिर्भर बनू शकणार नाही, असा जोरदार टोला काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारला लगावला. रायबरेलीत राहुल गांधी यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेला त्या संबोधित करत होत्या.

तुम्ही रोजगार आणि रेशन यात काय निवडाल असा सवालही प्रियंका गांधी यांनी केला. अशा प्रकारची धोरणे जो राजकीय पक्ष बनवेल त्यामुळे तुम्ही केवळ निर्भर बनाल, पण आत्मनिर्भर कधीच होऊ शकणार नाही, असेही प्रियंका गांधी म्हणाल्या. तुम्ही जर तुमच्या पायावर उभे राहू शकत नसाल तर सरकारची नीती धोरणेच चुकीची आहे, हे तुम्हाला समजून घेण्याची गरज आहे, याकडेही प्रियंका यांनी लक्ष वेधले.