अदानींना वाचवण्यासाठी माझी खासदारकी रद्द केलेली – राहुल गांधी

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची शनिवारी मध्य प्रदेशमधील शाजापूर येथे सभा पार पडली. यावेळी त्यांनी अदांनीबाबत मी संसदेत सत्य मांडत होतो. त्यामुळे अदानींना वाचवण्यासाठी माझी खासदारकी रद्द करण्यात आल्याचा आरोप केला.

”मी लोकसभेत सतत अदानींबाबतचे सत्य मांडत होतो. त्यामुळेच घाई घाईत माझी खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारचा रिमोट कंट्रोल अदानींच्या हातात असल्याने केवळ अदानींनाच वाचवण्यासाठी एवढ्या तत्परतेने माझे सदस्यत्व रद्द करण्यात आले. मला मात्र कसलीही पर्वा नाही. मी कायम सत्यच बोलतो’, असे राहुल गांधी म्हणाले.

मतदारांचा कल वळवण्यासाठी काँग्रेसने जनआक्रोश यात्रा काढली असून शनिवारी मध्य प्रदेशमध्ये झालेल्या सभेत राहुल गांधीही सहभागी झालेले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी जातिनिहाय जनगणनेचा पुनरुच्चार केला. काँग्रेस सत्तेत येताच जातिनिहाज जनगणना करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.