नवे मित्र मिळाल्यावर जुन्यांना विसरू नका; रामदास आठवलेंनी भाजपला सुनावले

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला निवडणूक आयोगाकडून पक्षाची मान्यता मिळवण्यासाठी दोन खासदारांची आवश्यकता आहे. यासाठी आम्ही शिर्डी व सोलापूर या दोन जागांचा आग्रह महायुतीत धरला आहे. भाजपने नवे मित्र मिळाल्यावर जुन्या मित्रांना विसरू नये, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजप नेत्यांना सुनावले.

आठवले म्हणाले, शिर्डी मतदारसंघामधून आपण स्वतः आणि सोलापूरमधून राजा सरवदे हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. महायुतीच्या जागा वाटपात आरपीआयला ही जागा न मिळाल्यास मोठी नाराजी पसरण्याची शक्यता आहे. कर्नाटकमधील भाजपा खासदार अनंत हेगडे यांनी संविधानाबाबत केलेल्या वक्तव्याचा आठवले यांनी निषेध केला. संविधान कोणीही बदलू शकत नाहा. हेगडे यांच्यावर कारवाईची मागणी भाजपाकडे करणार असल्याचे आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.