अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन अलर्टमोडवर

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन अलर्टमोडवर आले आहे. यासंबंधित प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. बालविवाह होताना आढळल्यास 1098 वर करावं संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असून माहिती सांगणाऱ्याचे नाव गोपनीय राहणार असल्याचेगी सांगण्यात आले आहे.

अक्षय तृतीयाच्या शुभ मुहर्तावर सामुदायीक तथा एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात. या समारंभात बाल विवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भंडारा जिल्हा हा बालविवाह मुक्त व्हावा याकरिता शासन स्तरावरून बालविवाह प्रतिबंध आदेश जिल्हयात लागु करण्यात आले आहेत.अक्षय तृतीयाच्या शुभ मुहुर्तावर होणारे विवाह समारंभ सोहळ्यात होणारे बालविवाह प्रतिबंधक करण्यासाठी बालविवाह प्रतिबंध अधिकारी यांचेस्तरावरून प्रत्यक्ष – अप्रत्यक्षरित्या मदत करणारे भंडारा जिल्हयातील “लग्नपत्रिका छपाई करणारे प्रेसचालक, मंडप डेकोरेशन चालक फोटोग्राफर,आचारी,मंगल कार्यालय लॉन सभागृह व्यवस्थापक,बैंडवादक, कॅटरिंग चालक,विविध जाती धर्मातील विवाह लावण्यात येणारी व्यक्ती यांनी विवाहाचे काम घेतांना मुलीचे वय 18 वर्ष व मुलाचे वय 21 वर्ष पुर्ण झाल्याची खातरजमा करूनच विवाह समारंभाची बुकीग घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मधील तरतुदीनुसार जो कोणी बालविवाह विधीपुर्वक लावण्यासाठी चालना किंवा परवानगी देईल किंवा विधीपुर्वक लावण्यास प्रतिबंध करण्यात हलगर्जीपणाने कसूर करेल यामध्ये बाल विवाहास उपस्थित राहणारी किंवा त्यात सहभागी होणारी व्यक्ती यांचाही समावेश होतो. ती व्यक्ती 2 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या सश्रम कारावासाच्या शिक्षेस आणि एक लाख रूपयापर्यंत असेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस देखील पात्र होईल.बाल विवाह सदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तथा महिला व बाल विकास विभागाच्या चाईल्ड हेल्प लाईन 1098 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. शिवाय माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे.