‘उजनी’तून शेतीसाठी कालव्याद्वारे आवर्तन देणार; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

11 जानेवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीत उजनी धरणाच्या कालव्याद्वारे शेतीसाठी एक आवर्तन देण्यात यावे तसेच पिण्यासाठी पाणी पुरविण्यास प्राधान्य देऊन उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, मोहोळचे यशकंत माने, करमाळ्याचे संजय शिंदे, पंढरपूरचे समाधान आवताडे, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्काद, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एच. टी. धुमाळ, अधीक्षक अभियंता धीरज साळे उपस्थित होते.

गतवर्षी पाऊस कमी झाला असून, उपलब्ध पाणी येणाऱया पाृवसाळय़ापर्यंत पुरविण्यासाठी सिंचन विभागाने नियोजन करावे, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिण्याचे पाणी पुरविण्यास प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचना केली. यापूर्वी कालवा सल्लागार समितीने मंजुरी दिल्याप्रमाणे पाण्याच्या आवर्तनाचे नियोजन केले नसल्यास त्या संदर्भात जिल्हाधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून चौकशी करण्यात येईल. आकश्यकतेनुसार आढावा घेऊन कालवा सल्लागार समितीची पुन्हा बैठक घेण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

उजनी प्रकल्पात सध्या 5.34 टीएमसी (9.58 टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. उजनी भीमा प्रकल्पाद्वारे सन 2022-23 मध्ये प्रत्यक्ष भिजलेले क्षेत्र 2 लाख 54 हजार 253 हेक्टर (84.50 टक्के) होते, अशी माहिती देण्यात आली.

अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी उपलब्ध पाणीसाठा, कालव्यातील आठमाही प्रकल्पीय पीकरचना, निर्मित सिंचन क्षमता व प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र, मागील पाच वर्षांतील पाणीपट्टी वसुली, खरीप व रब्बी हंगाम 2023-24मधील प्रत्यक्ष पाणी वापर, उर्वरत कालावधीसाठी पाण्याच्या नियोजनाविषयीची सविस्तर माहिती बैठकीत सादर केली.

यावेळी जिह्यातील लोकप्रतिनिधींनी समान पद्धतीने उपलब्ध पाणीवाटप करण्याची सूचना लोकप्रतिनिधींनी केली. माढय़ाचे आमदार बबन शिंदे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक कपोले हे दृकश्राक्य माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते.